शरद पवार – एक थोर नेता – एक उत्तुंग व्यक्तिमत्व
शरद पवारसाहेब – भारतीय राजकारणातला एक द्रष्टा नेता. सदैव जनतेच्या नाडीवर हात असलेला, जनतेच्या हितासाठी झटणारा, जनतेची अस्मिता जागवणारा, जपणारा नेता…. या लेखात मी साहेबांच्या जडणघडणीचा, वाटचालीचा आलेख घेत आहे…

एखाद्या नेत्याचे नेत्त्रुत्वगुण हे अनेक वर्षांच्या अथक प्रयत्न व समाजासाठी केलेल्या कामांमधून सिद्ध होते. त्याच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग येतात. पण त्यातच त्याच्या कसबाची कस लागते. सर्व कठीण परिस्थितीतून जो यशस्वीपणे बाहेर पडतो तोच नेता मानला जातो. लोककल्याणासाठी सातत्याने झटणारा नेताच लोकमानसात उतरतो.

शरद पवार यांचे नेतृत्व हे महाराष्ट्रातील नाही तर सार्‍या देश्यातील लोकांनी मान्य केले आहे.. पवारसाहेब हे सत्तेवर असले काय किव्वा नसले काय, ते कायम लोक्संपर्क ठेवून असतात. ते आपली नाळ लोकांपासून तुटू देत नाही. लोकांच्या नाडीवर बोट ठेवून तो लोकांशी संवाद साधतो. पवार साहेबांचा लोकसंपर्क रावांपासून रंकांपर्यंत आहे.
गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी कामांचा डोंगर रचला आणि कर्तृत्वाचा सह्याद्री उभा केला.

शरद पवारांच्या राजकारणाला समाजकारणाचा आशय प्राप्त झालेला आहे. राजकारण हे समाजाची उन्नती करण्याचे एक साधन आहे असे साहेब नेहमी म्हणतात. आणि त्याच अनुषांघाने त्यानी वेळोवेळी घेतलेले निर्णय हे महाराष्ट्राला वैभवाच्या काळाकडे नेणारेच होते. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी रोडमॅप तयार केला. पवार साहेबांनी त्यानुसार वाटचाल केली. त्यात काळानुरूप बदलही केले.

शरद पवार साहेब हे खरेच एक धैर्यशील वा द्रश्ते नेते आहेत. ते नेहेमीच परिस्स्थिति पाहून आणि तिला पोषक असा योग्य तोच निर्णय घेतात. मग प्रसंगी कॉंग्रेस पासून वेगळे होऊन १९७८ मधे पुलोद स्थापन करणे असेल किव्वा १९९९ मधे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ची स्थापना करणे असेल.

पवार साहेबांनी महाराष्ट्रात रोजगार हमी योजना जोमदारपणे राबविली, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा निर्णय घेतला, महिला धोरण ठरविले व ते कार्यान्वित केले, सहकारी चळवळीला दिशा दिली, राज्यात नवीन विद्यापीठांची स्थापना केली, फलोत्पादनाला प्रोत्साहन दिले, सर्वच क्षेत्रांत महिलांना समान संधी दिली, मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारून इतर मागासवर्गीयांना न्याय दिला, जिल्हा परिषदा व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण दिले आणि कर्जमाफीच्या द्वारे शेतकऱ्यांना दिलासा दिला.

जनतेला माहीत नसलेले पण महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे निर्णय पवार साहेबांनी घेतले आहेत. ते असे:
1) मुख्यमंत्री असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण साहित्य 18 मोठ्या खंडांत इंग्रजीत व मराठीत प्रसिद्ध केले.
2) महात्मा फुले यांचे समग्र साहित्य व विचार मराठी , हिंदी व इंग्रजी या तीन भाषांत प्रसुत करण्याची भूमिका त्यांनी बजावली आहे.
3) तिसरे तेवढेच महत्वाचे अनमोल कार्य म्हणजे मराठा आरक्षणाचे विधेयक महाराष्ट्राच्या विधिमंडळात पास करून घेतले.

पवार साहेब आज एक राष्ट्रीय नेते आहेत.. एक उत्तम संसदपटू म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. त्यांचे विरोधकही त्यांच्याविषयी आदराने बोलतात व वागतात. ते स्वतंत्र बाण्याचे आहेत. कृषिमंत्री या नात्याने शरद पवारांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक स्वरूपाचा होता. कृषिक्षेत्रातील गुंतवणूक चार टक्‍क्‍यांपर्यंत वाढली. अन्नधान्याचे उत्पादन विक्रमी ठरले.

शरद पवारसाहेब कमी बोलतात पण जे बोलतात त्यामागे विचार, तत्त्व, सत्त्व, महत्त्व, प्रभुत्त्व, विद्वत्ता, अनुभव असतो.

स्वतः च्या प्रकृती स्वास्थ्याला दुय्यम स्थान देऊन ते सामान्य माणसाच्या समृद्धी साठी अथक परिश्रम करत आहेत .

त्यांचा आज वाढदिवस. ७५ वर्षात त्यांनी पदार्पण केले. पण त्यांची कामाची पद्धत, उमेद पाहिली की वाटते ते अजून तरुण आहेत. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव त्यांना उदंड आयुष्य देवो वा त्यांचे मार्गदर्शन आम्हाला सदैव मिळत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना.