कालाय तस्मै नम:

कालाय तस्मै नम:

शिवसेनेचा इतिहास ज्यांनी जवळून बघितला आहे, त्यांना हे सगळ आठवत असेलच की, कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर सुरु झालेला प्रवास हा टप्प्या-टप्प्याने पुढे गेला. कोणीही कितीही म्हणत असेल की शिवसेनेत बंड झाल नाही, तर शिवसेनेच्या आरंभालाच शिवसेनेत फूट पडली. अरुण मेहता व अ‍ॅडव्होकेट रामराव आदिक यांच्यासह अनेक शिवसैनिक शिवसेनेतून बाहेर पडले. त्याच दरम्यान बाळासाहेबांचा एक आवडता शिवसैनिक नाराजीमुळे शिवसेनेतून बाहेर पडून त्याने परळ सारख्या भागात प्रति शिवसेना स्थापन केली त्याचे नाव बंडू शिंगरे. पुढे १९७७ साली हेमचंद्र गुप्ते बाहेर पडले. त्यांच्याबरोबर अनेक नगरसेवकही बाहेर पडले त्यावेळेस स्वत: मनोहर जोशी फुटणार होते असे काही शिवसैनिकांच्या तोंडातून मी स्वत: ऐकल आहे. पण,शिवसैनिकांच्या दबावामुळे ते दोन पाऊल मागे गेले आणि ते शिवसेनेतच राहिले.

1979-80 च्या काळात कम्युनिस्ट पार्टीचे नेते कृष्णा देसाई यांच्या खुनामधील एक प्रमुख आरोपी दिलीप हाटे जे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत AISO नावाची विद्यार्थी संघटना काढली. ही संघटना काढून ते थांबले नाहीत. तर, सातत्याने 3 वर्षे त्यांनी शिवसेना पुरस्कृत विद्यार्थी संघटनेचा पराभव करत मुंबई विद्यापीठावर कब्जा मिळविला.

मग शिवसेनेच्या सुरुवातीलाच उठाव लुंगी.. बजाव पुंगी म्हणत, मद्रासी समाजा विरुद्ध आक्रोश करत मराठी माणसाला एकत्र करण्याची पहिल्यांदा हाक दिली. मुंबईमध्ये त्यावेळेस असलेली मराठी माणसाची टक्केवारी लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेला यश देखील मिळाले. व त्याच दरम्यान दादर येथील भाषणात स्व. बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, मला ६५ % लोकांचे राजकारण करायचं. उरलेले ३५ % म्हणजे कोण ? तर ते आताचे दलित आणि इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी. तसेच मुंबईतील गेल्या ५० वर्षात झालेल्या दंगलींमध्ये शिवसेना विरूध्द दलित ह्या वरळी आणि परळ भागात झालेल्या दंगलींच्या स्मृती आजही अनेकांच्या मनामध्ये आहेत.

शिवसेनेच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि पहिल्या काळातच त्यांनी मुंबईवर पकड निर्माण केली. कॉंग्रेस त्यांना मदत करत होती असे आजही समाजात म्हटले जाते. त्याबद्दल न-बोललेलेच बरे.

1985 साली वसंत दादांनी एक वाक्य उच्चारले“दिल्लीच्या मनात मुंबईला वेगळे करण्याचा डाव आहे” आणि शिवसेनेला राजकीय लाभ झाला आणि शिवसेना पहिल्यांदा मुंबईत सत्तेवर आली.

ग्रामीण महाराष्ट्रमध्ये अनेक नेते फिरत होते आणि त्यामध्ये त्यात एक महत्वाचे नाव होते ते म्हणजे छगन भुजबळ. सन 1980-90 च्या दशकामध्ये काँग्रेस सोडून गेलेले शरद पवार साहेब हे काँग्रेसमध्ये परत एकदा सामिल झाले. उलथा-पालथ झालेल्या राजकारणामध्ये अनेक ओबीसी तरुण हे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली एकत्र आले व कधी नव्हे तेवढे यश सन 1990-91 च्या विधानसभेच्या निवडणूकीत शिवसेनेला मिळाले. ओबीसीचा मोठा गट बरोबर असताना मात्र जेव्हा मंडळ आयोगाचा प्रश्न उभा राहिला तेव्हा सेनेने मंडळ आयोगाच्या विरुद्ध भूमिका घेतली. पण जस मंडळ आयोगाचे वातावरण देशभरात तयार झाले तेव्हा बीजेपी बरोबर युती करून हिंदुत्वाची लाईन घेतलेल्या शिवसेनेने कमंडळची बाजू घेतली. इथल्या ओबीसी ने एकत्र येऊ नये, इथल्या शुद्र आणि अतीशुद्रांनी एकत्र येऊ नये हा बीजेपीचा प्रयत्न होता आणि त्यातूनच राम मंदिराचे प्रकरण वरती आले. तेव्हा मंडळशी लढायला आपण धर्माचा वापर करावा अस काही त्या तत्कालिन बुद्धिवंतांच म्हणण होत. तशी मंडळ विरुद्ध कमंडळ लढाई देखिल झाली. त्यावेळेस शिवसेनेने मंडळ आयोगाला विरोध केला. आणि त्यात शिवसेनेनेत पहिल्यांदा फुट पडली. ओबीसीचा एवढा भक्कम पाठींबा असून देखिल शिवसेनेने घेतलेल्या नाराजीबाबत उघडपणाने भूमिका घेत अनेक आमदारांसह छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले.

1980-90 च्या दशकामध्ये जगन्नाथ पाटील (आगरी) आणि कांती कोळी (कोळी) ह्या दोघांविरुद्ध प्रचार करताना आगरी समाजाने फक्त हातभट्टी लावावी आणि कोळी समाजाने मासे पकडण्यासाठी जाळी विणावी अशा प्रकारची टिका बाळासाहेबांनी ठाणे आणि डोंबिवलीमध्ये येऊन केली.

काळ पुढे गेला आणि 1993 साली नामांतराचा प्रश्न उभा राहिला. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा 1977 सालचा ठराव हा अंमलात आणावा लागेल हे तत्कालिन मुख्यमंत्री श्री. शरदचंद्र पवार साहेबांच्या मनात होते. त्यांनी तेव्हा उघडपणाने भूमिका घेतली की, ज्या फुले, शाहू, आंबेडकरांचे मी नाव घेतो त्या महाराष्ट्रामध्ये मी शब्द दिला आहे. आणि या सभेचा तसा ठराव असल्याकारणाने हे नाव दिलेच गेल पाहिजे अशी त्यांची आग्रही भूमिका होती. तेव्हाची दोन वाक्य आजही मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक दलिताच्या मनात आहेत. ते म्हणजे “मराठवाड्याचा आता तुम्ही महारवाडा करणार का ?” आणि“ ज्याच्या घरात नाही पीठ तो मागतो विद्यापीठ” ह्या भूमिकेमुळे कदाचित शिवसेनेला लाभ झाला असेल. सन 1995 च्या निवडणूकीमध्ये मराठवाड्यामध्ये शिवसेनेचे आमदार निवडून आले. काँग्रेसची सत्ता गेली. पण, सर्वाधिक बहुजन आमदार असतानाही शिवसनेत मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. काळ पुढे-पुढे जात होता… त्याच दरम्यान गणेश नाईक हे शिवसेनेतून बाहेर पडले. त्याची कारणे काहीही असो… पण गणेश नाईक यांच्यासारखा दिग्गज नेता, आगरी समाजाचा प्रतिनिधी हा त्याच दरम्यान बाहेर पडला.

1999 साली सत्ता गेली आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुवात झाली. त्यानंतर लगेचच शिवसेनेमध्ये धूसफूस चालू असल्याचे दिसून आले आणि थोड्याच दिवसात नारायण राणे या संघटनेतून बाहेर पडले. त्याच दरम्यान जेम्स लेन प्रकरण महाराष्ट्रात गाजू लागले. मराठा समाजामध्ये त्याबद्दल प्रचंड राग होता. जिजाऊंची बदनामी झाल्याचे स्पष्टपणाने दिसत असताना राजकीय भूमिका घेण्यास शिवसेना मागे पुढे झाली असे त्यांना वाटत होते. पण, शिवसेनेने भूमिका घेतली. पण, ती भूमिका काय होती. तर ज्यांनी भंडारकर इन्स्टिट्युटवर हल्ला केला त्यांच्या विरोधात शिवसेना उभी राहिली त्याची भूमिका जेम्स लेनला मदत करणार्‍यांच्या बाजूने होती. आणि शिवसेनेने जाऊन जेम्स लेनच्या पुस्तकामध्ये शिवरायांच्या बदनामीला ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे तुम्ही इतिहास संशोधक आहात असे म्हणत माफी मागितली. शिवसेना विरोधी पक्षातच काम करत होती.

प्रवास पुढे चालूच होता… आणि सन 2014 साली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. पहिल्याच वर्षी महाराष्ट्र भूषणचा पुरस्कार बाबासाहेब पुरंदरेंना देण्यात आला.बाबासाहेब पुरंदरेंनीच जेम्स लेनला माहिती दिल्याचे मराठा समाजाच्या मनात घट्ट बसले होते. बाबासाहेब पुरंदरेंच्या नावाला विरोध करण्यासाठी म्हणून गावोगावी शिवसन्मान परिषदा आयोजित करण्यात आल्या. त्या परिषदांना मिळणारा पाठींबा आणि समर्थन हे मी स्वत: बघितले आहे. लोक गावा-गावामध्ये वर्गणी काढून सभा आयोजित करीत असत. आणि माझ्यासारख्या ओबीसी समाजातील वक्त्याला बोलावून सभेचे आयोजन करीत होते. समाजांमधील भिंती तुटल्या होत्या आणि शिवाजी महाराजांच्या काळातील बहुजन एकत्र झाल्याचे दिसत होते. मी गावात गेलेल्या प्रत्येक सभेमध्ये मुसलमान, दलित, ओबीसी मराठा हे सगळे वर्ग एकत्र आल्याचे दिसत होते व सभेचे आयोजन देखिल तेच करताना दिसत होते. किंबहुना मराठा समाजाचे भावनिक एकत्रिकरण ह्याला जबाबदार कोण असेल तर महाराष्ट्र भूषणचा पुरस्कार आहे. असे म्हटल्यास काहीच वावगे ठरणार नाही. आम्ही 6 ते 8 महिने महाराष्ट्रात फिरलो. पण, महाराष्ट्रातील गावागावामध्ये पुरंदरेंनी लिहीलेल्या इतिहासाबद्दल आणि मातेसमान जिजाऊंच्या झालेल्या बदनामीबद्दल सर्वसामान्यांच्या मनात चीड होती आणि ती चीड आजही कायम आहे. तेव्हा देखिल शिवसेनेने भूमिका घेतली नाही. त्यामुळे शिवसेनेचा इतिहास आणि शिवसेनेचा प्रवास हा ज्यांनी-ज्यांनी पाहिला आहे, अभ्यासला आहे त्यांच्या-त्यांच्या हे लक्षात येईल की, राजकारणाच्या पटावर शिवसेना नेहमी तिरकीच चाल चालत आली आहे. आणि त्यातही ते यशस्वी झाले आहेत. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अनेकवेळा अनेक समाजांना डिवचून सुद्धा, अंगावर घेऊन सुद्धा शिवसेनेने माफी मागितली असे कधीही झालेले नाही. मात्र, मराठा समाजाच्या ऐक्यापुढे पहिल्यांदा शिवसेनेची मान झुकली आणि शिवसेनेला माफी मागावी लागली. याचे राजकीय परिणाम-दुष्परिणाम काय होतील…?

त्यांच्या तोंडातून पडलेला शब्द मागे घेण्याचा प्रकार शिवसेनेत कधीच घडला नाही. जे बीजेपी करु शकले नाही. ते शिवसेनेने करुन दाखवले. मुसलमानांना त्यांनी कधीही प्रेमाने मुसलमान म्हटले नाही. किंबहुना त्यांना पाकड्या, लांड्या म्हणण्यातच ते स्वत:ला धन्य समजत होते. त्यामुळे जातीय द्वेष वाढवणे ह्याच राजकारण गेली 60 वर्षे त्यांनी महाराष्ट्रात केल. पण, राजकारणाच्या गणितात ते नेहमी यशस्वी ठरले. एका ज्येष्ठ संपादकाला दिलेल्या मुलाखतीत संपादकांनी विचारले की, बाळासाहेब तुम्ही असे बोलता त्यामुळे समाजामध्ये काहीजण नाराज होतात. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की, माझ्या मनात येईल ते मी बोलतो, मला जे आवडते ते मी बोलतो. त्याचे परिणाम काय होतात याची काळजी मला नाही. कारण निवडणूक मला लढवायची नाही. निवडणूक जोशी, नवलकर यांना लढवायची आहे. पडले तर ते पडतील. मी पडणार नाही. अशी थेट भूमिका घेणा-या शिवसेनेने कधीही माफी मागितल्याचा इतिहास महाराष्ट्राला आठवत नाही.

जन्मानंतर आजपर्यंतच्या प्रवासामध्ये अनेकवेळा बहुजन विरोधी भूमिका घेऊन सुद्धा बहुजनांची मते मिळणे या राजकीय गणितामध्ये शिवसेना यशस्वी ठरली. चंद्रकांत खैरेंसारखे स्वत:च्या जातीची 100 मते नसलेले शिवसैनिक खासदार झाले. हे गणित सोडविता येणार नाही. चेहरा बहुजन विरोधी. पण, मते बहुजनांची. काही असो… पण, ह्यावेळेस मात्र त्यांना मराठा समाजाच्या रेट्यापुढे आणि कदाचित महानगरपालिका निवडणूकीच्या गणितामुळे दोन पाऊले मागे जाऊन माफिनामा सादर करावा लागला. काळ बदलला… की शिवसेना बदलली हे काळाच्या ओघात समजेल. सद्ध्या एवढेच म्हणावेसे वाटतय… कालाय तस्मै नम:

-डॉ. जितेंद्र आव्हाड

Email – [email protected]
Twitter – @Awhadspeaks
Facebook – facebook.com/jitendra.awhad
Mobile No. – 9820055300

भारत माता कि जय

भारत माता कि जय

परवा रात्रीपासून सुरु झालेले “सर्जिकल आपरेशन” हे काही भारताने पहिल्यांदा केलेली कृती नव्हे. याआधी कित्येकदा अशा प्रकारची कृती भारताने केलेली आहे. यावेळी फरक फ़क्त एवढाच आहे की, या घटनेचे खुपच मस्तपैकी “इवेंट मॅनेजमेन्ट आणि मार्केटिंग” करण्यात आलेआहे. भक्त नावाच्या जातीची नवीन पैदास झाली आहे. त्यांचा पडलेला बाजारभाव वाढवण्यासाठी खुप ताकतीने ते कामाला लागते आहेत. पण याचे देशाला काय गंभीर परिणाम भोगावे लागतील याचा साधा विचारही करताने ते दिसत नाहीत. बीबीसीवर एक निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला नुकतच ऐकल. अमेरिकेलाही याची पूर्ण कल्पना देऊनकी, आम्ही केवळ पाकव्याप्त कश्मिरमधील आतंकवादयाविरोधी कृतीला उद्यापासून आरंभ करीत आहोत आणि या सर्जिकल आपरेशनची सुरुवात झाली. त्यामुळे हे काही पाकिस्तान विरोधातील पुकारलेले युद्ध नव्हे आणि तसे होऊही नये; याआधी “राममंदिर” सारख्या भावनिक मुद्द्याचा असाच एकदा राजकारणासाठी वापरझालेला देशाने बघितला आहे. आणि त्याचे परिणाम या देशातील अनेक गरीबांना सहन करावे लागले. याही वेळा “सर्जिकल ऑपरेशनला” युद्ध म्हणून ढोल पिटत आहेत. अनेकवेळा Line Of Control क्रॉस करणे ही भारतीय सैन्याच्या दृष्टीने नित्याचीच बाब आहे. पाकव्याप्त काश्मिरमध्ये भारतीय सैन्याच्या हालचाली ह्या नेहमीच दिसत असतात. पण, उरीच्या हल्ल्यानंतर खिंडीतच तिथल्या अतिरेक्यांची तळे उद्धवस्त करणे हा भारतीय सैन्याच्या कर्तव्याचाच भाग होता आणि प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान आहे.

अफगाणिस्तान मध्ये दहशतवादी तालिबानी हिंसाचार सुरु झाल्यावर असंख्य हल्ले अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तानच्या लगत असलेल्या पाकिस्तानी क्षेत्रातील काही परिसरावर अमेरिका आणि रशियाने केले. सध्या ISI च्या नावाने सुरु असलेल्या जगभरातील दहशतवादाला धडा शिकविण्यासाठी इराक, रशिया, अमोरीका, फ्रान्स या अनेक राष्ट्रांनी सिरीयावर “सर्जिकल स्ट्राईक” केले. पण, कुठल्याही राष्ट्राने त्याला युद्ध म्हणून संबोधले नाही किंवा त्या-त्या राष्ट्राध्यक्षांच्या नावाचा अभिनंदनाचा पाऊसही पाडला नाही. कारण, ते करणे त्या राष्ट्राच्या दृष्टीने internal defence चा भाग म्हणून अतिशय महत्वाचे होते.

भारताने केलेली कारवाई हि काही आज पहिल्यांदा केलेली नाही आजवर अशी सर्जिकल ऑपरेशने ब-याच वेळा भारताने केलेली आहेत हे चॅनेल वर निवृत्त लष्करी अधिकारी सांगतात. पण गेल्या 70 वर्षात हे पहिल्यांदाच झालं असे ढोल पिटले जात आहेत. हा तर राजकीय आत्मस्थितीचा कळस आहे. या आधी भारताने पाकिस्तान विरुद्धची युद्ध जिंकली. 1965 साली पाकिस्तान विरुद्धचे युद्ध आपण लाल बहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली जिंकले होते. त्यानंतर 6 वर्षातच1971 साली इंदिराजी पंतप्रधान असताना पाकिस्तान विरुद्धचे युद्धजिंकून पाकिस्तानचे दोन तुकडे केले. त्या वेळी पाकिस्तानचे 91000सैन्य पकडले गेले होते. पाकीस्तानी सैन्याला गुडघ्यावर आणण्याचे काम स्व. इंदिराजींनी केले होते. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि परराष्ट्र मंत्री हेन्री किसनंजर यांनी सातवा आरमार पाकिस्तानच्या समर्थनार्थ पाठवलेला असतानाही इंदिराजी डगमगल्यानाहीत’; “त्या म्हणाल्या “आज अमेरिकेने धमकीवजा निरोप दिलाय कि त्यांचं 7 व आरमार पाकिस्तानच्या बाजूने भारताविरुद्ध बंगाल च्या उपसागरात उतरेल. अमेरिकेचा मानवी हक्कांबद्दलचा ढोंगीपणा आज उघड झालाय पण मला त्यांना सांगायचं आहे कि भारत एकही पाऊल मागे हटणार नाही उलट अत्यंत निकराने हे युद्ध लढेल.

त्या नंतर लगेच 1974 साली पोखरण मध्ये अणुबॉम्ब च्या यशस्वी चाचण्या घेऊन इंदिराजींनी अमेरिकेलाही सूचक इशारा दिला.

कारगिल मध्ये जे झाला ते सुद्धा अभ्यासण्याची गरज आहे. कारगिलमध्ये पाकिस्तानने हळुहळु पाकिस्तानच्या सीमेलगतच्या बाजूने छावण्या निर्माण करायला सुरुवात केली. आणि तिथे गुरे चरण्यासाठी नेणा-या एका गुराख्याच्या मुलाने ही माहिती भारतीय जवानांना दिली आणि त्यानंतर भारतीय जवानांनी दाखवलेले शौर्य हाच भारताचा इतिहास आहे. ते युद्ध जिंकताना वापरण्यात आलेल्या बोफोर्स तोफांवरही टिकेचा भडीमार झालेला असतानाच त्याच तोफांनी भारतीय सैन्याने पाकिस्तानला धडा शिकवला आणि कारगिल परत काबीज केले. ज्यांना-ज्यांना सन 65 आणि 71 चे युद्ध आठवत असेल त्यांना ते युद्ध लढत असताना एक अनुभव जो मी स्वत: अनुभवलेला आहे. तो म्हणजे Blackout संपूर्ण भारतात संध्याकाळी दिवे न-लावण्याचे आदेश सन 71 च्या युद्धात दिले गेले होते. वाहनांचेही दिवे बंद करण्यात आले होते. खासकरुन जी महत्वाची शहरे आहेत त्यांना तर हे आदेश काटेकोरपणे बजावण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात असत. सुरळीत जनजीवन विस्कळीत झाले होते. कारगील युद्धाच्या दरम्यान असे कुठले प्रकार भारतामध्ये झाले नाहीत.

सोशल मिडीया आणि काही उत्साही पत्रकार ज्या पद्धतीने उन्माद निर्माण करीत आहेत. तो निंदनीय नाही तर देशाला धोकादायक आहे. सन 1945 साली अण्वस्त्राचा पहिल्यांदा वापर झाला. त्याचे परिणाम आजही हिरोशीमा, नागासाकी भोगत आहेत. तेव्हा फक्त अमेरिकेकडेच अणुबॉम्ब होता. आज अणुबॉम्ब कोणाकडे आहे, कोणाकडे नाही याची कल्पना देखिल जगामध्ये कोणाला नाही. ही आपली ताकत आजमविण्याची परिस्थिती नसून मर्यादित स्वरुपात त्या राष्ट्राला समज देण्याची गरज आहे. आणि ती भारतीय सैन्याने दिलेली आहे. आम्ही काय-काय करु शकतो, तुम्हांला कसे ठेचू शकतो, तुमच्या नांग्या कशा मोडू शकतो हे भारतीय सैन्याने त्यांच्या भूमीवर जाऊन त्यांना दाखवून दिले. त्यात भारतीय सैन्याची शस्त्रनिती, युद्धनिती आणि शौर्यनिती ह्या तिनही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. पाकिस्तानचा झालेला केवीलवाणा चेहरा आणि त्यानंतर ते करीत असलेली सारवा-सारव त्यामुळे पाकिस्तान अंतर्गत पाकिस्तानची झालेली नामुष्की ह्याला भारतीय सैन्यच जबाबदार आहे. याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. पण, हे सगळ भारतीयांना अभिमानाचे वाटत असताना ह्या संपूर्ण प्रकरणाचा काही भक्त ज्या पद्धतीने उन्मादक भावनेतून हे व्यक्त करीत आहेत. त्याला कुठेतरी परिपक्वपणाने आवर घालण्याची गरज आहे.

त्यामुळे ह्या सर्जिकल स्ट्राईक बद्दल नियोजनबद्ध पद्धतीने अतिरेक्यांचे ठाव-ठिकाणे शोधून त्यांच्यावर चढविलेल्या हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीयांचा उर अभिमानाने भरुन आलेला असताना पक्षीय अभिनिवेष बाजूला ठेवून प्रत्येक राजकीय पक्षाने सरकारच्या मागे उभे राहण्याची भूमिका घेतलेली असताना भक्तांनी स्वत:ला आवरण्याची गरज आहे. कारण उद्या काही बरे-वाईट झाले तर धीरगंभीरपणे त्याचाही विचार करा फक्त एवढेच सांगण्याची गरज आहे.

-डॉ. जितेंद्र आव्हाड

MODI WAVE ON DECLINE

Three months after storming to power at the centre, the BJP, for second time running, took a knock in the state by-polls losing 4-6 to the RJD- JD(U)- Congress combine in Bihar and yielding two strongholds to the Congress in MP and Karnataka.

Out of the 18 seats in Punjab, Bihar, Karnataka and Madhya Pradesh for which bypolls were held, Congress and its allies have won 10 seats to BJPs 8. This shows a clear downward trend for the BJP, with its vote-share percentage dipping by 7% compared to the Loksabha elections.

Incidentally, in all these assembly constituencies, the recently-conducted Lok Sabha elections had given phenomenal leads to BJP.

With the by-poll results, one can gauge the mood of voters. They have slowly but surely started to realise reality. Facts count not promises. In the history of Independent India, no ruling party has ever lost by-elections conducted within 3 months of election.

Elections are an exercise of faith for the Indian masses. We need to wake up to the fact that it is the masses who decide the fate. The voter today is far more discerning, alert and politically aware. He may be poor in pocket but and he surely knows his mind.

Implicit in the outcome is another message – that state elections may be a different story from the Loksabha polls. Uttarakhand had delivered a similar message recently.

The Indian voter is clever. He was propelled by the Modi wave in the general election but was equally quick to rebuff the BJP when he realized that the ‘Acche din’ slogan doled out to them was in reality a piped dream.

The biggest irony ever!

The biggest irony ever!

The biggest irony ever! Newly-appointed chairman of Indian Council of Historical Research (ICHR) Yellapragada Sudershan Rao justifies the ancient caste system. He had earlier written a blog stating the merits of caste system. How relevant is it in Modern India?

Incidentally, Golwalkar Guruji, Sarsanghchalak of RSS, in his book Bunch of Thoughts, had also written in favour of the caste system, and stated that caste system had helped to preserve the unity of our society. I wonder how there can be unity in discord?

It saddens me deeply that such primitive thinking exists even today. What social development can we talk of in a nation where such archaic thinking exists? And such people like Sudershan Rao are the custodians of our country’s history? One of the objectives of the ICHR is to have rational presentation and interpretation of history. If the chairman’s interpretation can be so regressive, are we moving backwards or forwards is the question. Really sad.

– Jitendra Awhad
15 July 2014